Tuesday, February 22, 2011

काय घडते कशासाठी ?

फुल फुलते, गंधित होते,सुगंध त्याचा लुटण्यासाठी
भुंग्यांची मग होते धावपळ, त्यातला मध वेचण्यासाठी

नभातुनी सर बरसते, दाह धरतीचा शमवण्यासाठी
आमची नाहक धावपळ होते, मृदगंधाच्या वासासाठी

मीरा भजनी तल्लीन होते, शाम सुंदरा वरण्यासाठी
वेणूतुनी धून लहरते, बावऱ्या राधेस शाहरण्यासाठी

मीरा  आणि राधा वाहती, आपुले सर्वस्व जगदिशासाठी
कालचक्र पुढे सरकते, घाव जिव्हारी झेलण्यासाठी

No comments:

Post a Comment