Thursday, March 31, 2011

असेही एक "एप्रिल फूल"

मी एक जागरूक पुणेकर या नात्याने सर्व कामे बाजूला ठेवून चहा बरोबर पेपर वाचत होतो. काही प्रमुख बातम्यावरून नजर फिरवली आणि त्यावरील प्रतिक्रिया देण्या साठी हिला हकनाक हाक मारली.
कारण बातम्या होत्याच तशा सनसनाटी.....
चितळे बंधू मिठाईवाले यांनी पुण्यात स्वतःच्या १०० शाखा सुरु करण्याचे ठरवले. पाश्चिमात्य बाजार पेठेस अनुसरून मुख्य दुकान यापुढे २४*७ असे पूर्णवेळ ग्राहक सेवा देणार ...सकाळ पुणे.
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... महाराष्ट्र टाईम्स मुंबई
येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान .. टाईम्स ऑफ इंडिया यासारख्या स्थानिक, राज्य स्तरावरील किंवा राष्ट्रीय पातळीवरील अशा बातम्या आपल्या आज वाचनात आल्या तर तुम्ही काय कराल.
मला माहित नाही तुमचे पण मी काय केले ते सांगतो
मी  तिन्ही वेळा पेपर पुन्हा पुन्हा उलट सुलट कर करून बघितला  आणि चहा घेता घेता ओरडून म्हणालो, " अग्ग्ग पाहिलस का पेपरात काय आलंय! "
त्यावर आतून आवाज आला ...."मला मेलीला मिळतो इतक्या लवकर वाचायला पेपर,काय ते तुम्हीच सांगा. "
अग काय ऐकतेस का ? कोठून सुरवात करू
हे बघ दिल्लीची घोषणा आहे ....येत्या पाच वर्षात सर्व खेड्यांना विद्युत पुरवठा करणार..पंतप्रधान
बर! डब्यात भाजी काय देवू. म्हणजे बर ! बातमीसाठी आणि भाजी काय देवू माझ्यासाठी.
पुढे ऐक, महाराष्ट्र टाईम्स ने म्हटलेय
अण्णा हजारे यापुढे कसलेही उपोषण मागे घेणार नाहीत. ... ऐक प्राणांकित घोषणा ... महाराष्ट्र टाईम्स
ते ठीक आहे, तुम्हाला डब्यात किती पोळ्या भरू ते सांगा.
अग मी बोलतोय काय तुझे चाललेय काय ?
बर आता आपली पुण्याची बातमी ऐक .
चितळे बंधू त्यांच्या १०० शाखा काढणार आहेत. आणि त्याचे मुख्य शाखा आता चोवीस तास आणि सातहि दिवस उघडी ठेवणार.
अहो! तुमची तब्येत ठीक आहे न ! आणि बर नसेल तर कामावर जावूच नका. पण हे काय भलतेच वाचताय मगापासून ...
अग असे काय करतेस आज एक एप्रिल आणि मी आजचाच पेपर वाचतोय म्हटले ...

अस्स होय. आत्ता समजले आता पेपरवाले पण 'एप्रिल फूल' करतात वाटते.

No comments:

Post a Comment