Friday, April 1, 2011

माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग सात

चिमणी चाक
जंगलातील चिमणी कोणताही संग्रह करीत नाही लागणाऱ्या दिवसापुरती कमाई केली आणि स्वच्छंदी राहील असे तिचे जीवन असते.
पोलादपूर महाड प्रवास फार सुंदर झाला चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज महाड नदीत स्नान प्रवास रामदास .. रामकृष्ण
लंगोटी वरून विचार
....... x .......
s t stand वर झोपून. पाणी सोय शेडच्या मध्ये नाही. तोंड धुवून माणगाव रस्त्याने पुढे जाता पाळे येथे सावलीत. इथे कां? एकाने पृच्छा केली.
मुंबईला निघालो आहे चालत. मला वाटले वेडसर आहात पण तसे वाटत नाही .इथच थांबा. गावात तुमच्याकरिता काही पैश्याची सोय होते कां? नंतर वडारी केंजळ बाजूचे अशी ओळख करून देऊन त्याने आपल्या प्रपंचाची कहाणी सांगितली मुलगा थोरला नाव रामदास सुनेचे नाव सुलोचना अलीकडे पटेना ती ३/४ दिवस जेवा काही म्हणेना वेगळे राहण्याची प्रवृत्ती पाठीमागची भावंडे त्यांच्यावर माया नाही. त्यांना सल्ला. जर तुमच्या शिवाय संसाराचे गाडे अड्नारच असेल तरच तुम्ही त्यात लक्ष घाला सुनेला सिनेमा हवा वगैरे हकीगत. मुलांच्या अंगी कर्तुत्व असेल तर तो किती उड्या मारतोय ते पहा. बापाची आणि मुलाची माया तुटत नाही वेळेला ते एक झाल्याशिवाय राहणार नाहीत तरी त्याला तोडल्या सारखे दाखवा पण तोडू नका. दुपारी तीन वाजे पर्यंत जेवणाचा निरोप आला नाही तेंव्हा confirm करून पुढे निघण्याची तयारी तेंव्हा ४ पुऱ्या मुलाबरोबर आल्या. रस्ता तापला आहे पायाला फोड आले तरी श्रद्धेने पुढे पाऊल. दक्षिणेश्वर या ध्यासाने रायगडाची ओढ असूनही गेलो नाही. बौद्ध व पांडव लेण्या पहिल्या नाहीत महात्माजींना एकदा जोग फाल्स पाहायला येणार कां असे विचारले असता मी याहूनही उंचावरून पडणारे पाणी पहिले आहे (पाऊस) मी माझ्या कामात निमग्न आहे तुम्ही जावून या या उत्तराची आठवण पुढे वीट भट्ट्या, खाडीचे पाणी आत घुसलेले. देखावा सुंदर पुलाच्या कट्ट्यावर बसलो असता एक समाज सेवक आंबेडकर यांची गाठ त्यांचे गाव मैलावर.प्रवासाची कल्पना दिल्यावर दासगावी धर्मशाळा असल्याचे सांगितले जे बुद्ध झाले त्यांच्या वागणुकीत फरक झाला आहे कां? फक्त टोपी पाटी बदलल्यासारखे हे झाले आहे.त्यांच्या म्हणण्या प्रमाणे खर्च आटोक्यात, मुख्यतः हिंसेबद्दल कोंबड्या वगैरेबद्दल मला विचारायचे होते ठाम उत्तर नाही.
डोंगरातच घळीतच मुक्काम महाड पेक्षा हवामान रात्रीचे आल्हाद दायक
........ x .......
सकाळी उठून पाहतो तो भोंवती डाव पडलेले.उठून पाहतो तो रानफुल जाईसारखे पांढरे शुभ्र प्रसन्नतेने हासते आहे. प्रत्येक वस्तूच्या निर्मिती मागे काहीतरी परमेश्वरी हेतू दडलेला असतो हे निश्चित प्रसन्नतेने अधिक प्रसन्न वाटले हे मात्र खरे पुढे पाणी लागेल तिथे स्नान.परंतु आज सौ उन्हेरे नारळीच्या बागेत उन्हाळी असलेले हे स्थान, असे स्नान हि मेजवानी वाटली. पाण्याची तीन कुंडे पहिल्या कुंडावर मुस्लीम पद्धतीने बांधकाम . शेजारी दर्गा, कबर १३४२ H असे नमूद असलेले त्याला जी निशाणी वाहिली ती भगव्या झेंड्याच्या आकाराची रंगाने हिरवी होती. मुसलमानी प्रार्थना
स्नान करताना एकजण 'या अल्ला परवर दिगार' असे म्हणाला. लोकांनी लावलेली काठी असे तिथे खेळणाऱ्या मुलीला फकीर म्हणाला.परंतु लोकांनी कुठली आम्हीच लावली आहे असे छोटी मुलगी वय ८ते१० म्हणाली. दासगावला अंदाजे १.५ ते २ च्या सुमारास पोहोचलो व हॉटेल मध्ये जावून साधुत्व वृत्ती धारण करून मुंबई मार्गे बंगालला दक्षिणेश्वरी जात आहे आपणास आपल्या इच्छेने काही (उपहार) द्यावयाचे असल्यास देऊ शकता. चहा पुढे आला तो घेवून अंमळ प्रश्नोतरे ऐकत होतो. खा पिके सौना नाही खा पिके सौ देना साधू समाजाला अनुपयुक्त (भूभार) असा कदाचित त्यांचा ग्रह झाला असावा असे वाटून ठिकाण सोडले.दासगावला मी परमेश्वराचा दासानुदास असून दक्षिणेश्वराच्या रोखानेच माझी पाऊले पडतील व एकदा तोंडातून बंगालचे नाव निघाल्यावर आता मागे घेता येणार नाही. सूर्य मावळे पर्यंत जमेल तसे चालावयाचे मुक्काम लोणारीला वाटेत नाक्यावर एक ग्रहस्थ (वेषावरून) ब्राह्मण भेटला त्याला मी देवाचे नावाने घर सोडले आहे पायी प्रवास चालू आहे आज कुठे मुक्कामाची सोय होत असेल एखाद्याचे नाव सांगा. तात्या खोत जाणकार आहे तुमची नक्की सोय होईल परंतु तिथे गेल्यावर सर्वजण

सिनेमाला जाणार आहेत बायकांनी नाक्यावर जावे असा सल्ला दिला.व तेथून निघालो बुंदी लाडू पोटभर पाणी आणि st शेड मध्ये मुक्काम. वाटेत एका मुसलमानाच्या घरी पाणी पिण्याचा प्रसंग आला त्या घरी हरिश्चंद्र नावाचा गुराखी होता. त्यास म्हणालो पाणी जे देवाने निर्माण केले ते हिंदुकारिता अगर मुसल मानंकारिता नव्हे व मुसलमान अखेर माणूसच आहे
वार दिनांक जाने १९७ लोणारी पासून पायी प्रवासास सुरवात. माणगाव सुमारे १ मैल. सुमारे १६ तासात पाणी नाही व १.५ दिवसाहून जास्त जेवण नाही. चाल मात्र चालू चलो अभेदानंद अभी चलो. गुरु म्हणून कुणा माणसावर माझा विश्वास ठेवावयाची तयारी नव्हती, म्हणून प्रत्यक्ष भगवंतच माझा गुरु झालाय. वेळ आली म्हणजे गुरु भेटल्याशिवाय राहत नाही तो प्रत्यक्ष चालून येतो.सहन करण्याची वृत्ती म्हणजे तितिक्षा याचे आज असे धडे घेतले
पोटात अन्नाचा कण नव्हता. पाणी नाही तरी मधले काही क्षण विलक्षण समाधानात गेले येता येता उपवासाचा खरा अर्थ कळला सर्वांभूती आत्मा या तत्वाची जाणीव व्हावी म्हणून उपवास. वाटल साऱ्या श्रीमंतांना २ दिवस उपवास करावयाला सांगावे म्हणजे त्यांना गरिबांबद्दल खरा कळवळा उत्पन्न होईल खांजाई देवीजवळ बंगालच्या परिस्थितीबद्दल चे एक कच्चे निवेदन तयार केले. देवीच्या देवळात बैठक (meeting) बहुदा राजकीय कार्यकर्त्यांची . मी तिथे कदाचित थांबेन म्हणून त्यांनी मला माणगावला जायचा सल्ला दिला
----------- x ----------
माणगावच्या नदीत स्नान करताना मामू अशी भाषा, परंतु गळ्यात जानवे दिसले पेर फुटीवर कपडे वाळत टाकलेले सोडवून घेताना काट्याशी धसमुसळे पणा करून चालत नसतो.
वसंत भुवन देहरूपी गाडीमध्ये पाण्याचे पेट्रोल भरून पुढील प्रवासास. कोलाड नोगोठ्ण्याचे दिशेने. वाटेत बायकोच्या खुनाचा आरोप असलेला कातकरी पहाण्यात आला पण निरखून पाहिले गेले नाही. खांबला आज प्रथमच एके ठिकाणी (वेदक) जावून मी देवाकरिता गाव सोडले असून मुंबईस पायी प्रवास करीत आहे. आज संध्याकाळी मुक्कामाची व्यवस्था व्हावी.
तेंव्हा एका प्रौढ बाईने इच्छा असली तरी मुलाला पसंत पडणार नाही थोडे तांदूळ घेवून जा व देवीच्या देवळात मुक्काम करावा असा सल्ला दिला Helpless असल्याबद्दल
रागवू नये. तसे मानण्याचे काहीच कारण नाही म्हणून निरोप. देवळातील पोथी प्रवचने पुराणे बंद पडली असावीत तथापि नित्य पूजा चालू. मुंबईकर मंडळींनी भक्ती भावाने मोठी घंटा अर्पण केली आहे.देवळातच शाळा तीतीक्षेकारिता काही पाळणूक थके पर्यंत चाललो, भूक लागल्यावर जेवण . अंगावर एक किडा २-३ दा फुंकर मारली तरी हलेना तेंव्हा बैस बाबा म्हणालो अशीच भगवंताची वागणूक असावी. What creative energy has got by brain
स्वप्न सुंदरीचे सौंदर्य माझ्यावर परिणाम करू शकले नाही. स्वप्न आपण नुसते पाहतो परंतु स्वप्नातील भावनेशी एकरूप होवून त्या देखाव्यात जे शुचितेचे वातावरण तयार केले होते त्यात भर म्हणून रांगोळी पाहिजे असे मनात येवून "रांगोळी" असे उद्गगार बाहेर पडले.परंतु ते अखेर स्वप्नच होय.तशा प्रकारेच माणूस या जगताशी एकरूप झालेला असतो. बोगदेवजा गुहा पाणी मारून थंडगार आल्हाद दायक वातावरण
................. x ................
खांब हून सकाळी नागोठ्ण्याचे दिशेने जात असता एकाच्या गळ्यात पाली असे नाव लिहिलेला गंजीफ्राक दिसला तत्पूर्वी पाली बद्दल सूचना मिळाली होती. पाली वाकण पासून पाच मैल मध्ये नदीवर स्नान पुढे चाल पालीच्या दिशेने. पुलावर डोळे मिटून पडलो असता आकाशाचा देखावा त्यातून एक काळा ठिपका स्वच्छ आकाशात एक पक्षी उडतो तसा निर्माण होवून विलीन. पालीला पोहचल्यावर देवळात थांबू नये असा सूर. परंतु परिस्थिती सांगितल्यावर धर्मशाळेवजा ओवरीत पाडावयाची पंचांची परवानगी(आपटे)
इतरही बेत बोललो पण no response म्हणून निरोप स्वस्थ झोप. श्री गणेशा पुढे निवेदन करावे अशी भावना.
................. x ................
डायरीतील नोंद-मला समजलेली --
यापूर्वीच्या भागात त्यांनी महाबळेश्वर पासुन पुढील प्रवास पायी केला असे मी म्हटले होते. पण सातव्या भागाची सुरवात बघताना त्यांच्या नोंदीवरून असे वाटते कि, त्यांनी महाबळेश्वर सोडताना पोलादपूर पर्यंतचा प्रवास पायी केला आहे आणि त्यानंतर पोलादपूर ते महाड हा टप्पा बहुदा प्रवास वाहनाने केला आहे.कारण हा प्रवास सुंदर झाला असे लिहताना ते म्हणतात-
'चाकाच्या घरघरी बरोबर राम कृष्ण राम कृष्ण परमहंस आवाज' त्यावरून,चार ते सहा दिवसानंतर त्यांनी एक टप्पा गाडी वापरली असावी आणि त्या प्रवासात गाडीच्या संथ लयीतील आवाजाबरोबर त्यांचे मनातील विचार उफाळून वर आले असावेत.आपले नव्हते का होत लहानपणी कि,जर पिठाच्या गिरणीत गेलो तर तेथील चाकाच्या पाट्याच्या लयीत कोणतेही गाणे म्हणता येत असे तसेच काहीसे झाले असावे.याप्रमाणे घर सोडल्यानंतर त्यातल्यात्यात सुखाचा प्रवासाचा बसने केलेला प्रवास संपल्यानंतर पहिली रात्र त्यांनी एस.टीच्या शेडमध्ये काढली आणि पुढील प्रवास पायी सुरु केला. घर सोडून आलेला मानसिक ताण खाण्या पिण्याची सुरु झालेली अबाळ यांच्या बाह्य खुणा चेहरा शरीर यावर दिसू लागल्या असाव्यात. आणि त्यामुळेच पुढच्या टप्प्यात थकलेले शरीर विश्रांती साठी झाडा खाली विसावतच,बघणाऱ्याच्या नजरेत एक वेडा थांबल्याचे दिसते.
यानंतर पुढील दोन तीन दिवसातील प्रवास म्हणजे, घेतलेला निर्णय किती कठीण आहे, पुढे किती कष्टप्रद परीस्थीतीस तोंड द्यावे लागणार आहे, याचीच झलक होती. पायी सलग चालण्याची सवय अद्याप झाली नसल्याने, पायास फोड येणे;शिधा अथवा जेवण उपलब्ध होण्यात आलेला अनियमितपणा, यातून किती कठीण परिस्थिती अनुभवली, याची साक्ष ठायी ठायी दिसते.

No comments:

Post a Comment