Sunday, December 19, 2010

वाहिली धुंद आज सरिता

सोडूनी बंध, फोडुनी बांध, वाहिली धुंद आज सरिता
ओढ हि तिला कशाची कळेना, झुगारली बंधने कोणा  करिता ?

ओसरता पूर, धपापला उर, तुटले नुपूर, सारे निशब्द क्षणाकरिता !
थांबला खेळ, बसेना मेळ का अशी धावली कशा करिता ?

कुठे गेले तिचे संयमी पात्र, मर्यादेत राहणे , गतिशील वाहणे न पाही किनारा,
होता दूरवर माझाच पसारा, गतीशिलतेचा असे ठावूक दरारा !

आता वाटते तुजला कि,मी झाले बेधुंद, मला न दिसे किनारा,
कोणाची मर्यादा कोणी मोडली ? उत्तरात आहे प्रश्नाचा पसारा.

न बंध मानिले, न साहिले अकारा,उरे मागे एक केवळ दीर्घ सुस्कारा!!!

ओसरता पूर, आशेचा सूर
इथे होते मंदिर इथे होता पार

खुणा शोधीत धावे रस्ताच दूर
न सापडे गाव , न दिसे भाव

प्रत्येक नजर घेई काळजाचा ठाव
शोधण्या आधार उचलता नजर

नजरेस दिसेना काहीच आरपार ....

2 comments:

  1. अप्रतिम रविंद्रजी! सुंदर शब्द रचना !

    ReplyDelete
  2. दिपकजी!
    मनपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete