Wednesday, October 13, 2010

कवी मन आणि कविता !

कवी मन आणि कविता यावर लिहावयाचे झाले तर,

त्यासाठी देखील तुम्हास कवी कल्पना करता येणे जरुरीचे आहे.

प्रत्येक कवी भावनांना वाट करून देतांना सहजतेने लिहतो.

मला बरेचदा एखादी कल्पना सुचते. पण त्याला कारण अमुक एक

घटना नसते. पण बऱ्याच कविता सुचतात,

दिवस आणि रात्रीच्या धूसर सीमारेषेवर.

सांज, कातर अशी ती मनाची गलबल वाढवणारी वेळ.

सहज म्हणून लिहावयास घेतले तर मनाची अवस्था ......

कधी शब्द सहज येतात, विचारांची जणू गाणी होतात.

पण कधी शब्द रुसतात, भावनांचा रस्ताच अडवून बसतात.

कधी सापडतो ताल, कधी भरकटणे बेताल.

कधी पायवाटेची वहिवाट, कधी राजमार्गाचे हरवणे.

कधी उन्मेषास आहोटी, कधी उद्वेगाचे बरसणे ...

आणि मग या अवस्थातून जाताना...

एखाद्या सांजवेळी प्रेयसी,

वाट पाहून पाहून थकलेली असते,

तरीही त्याने येण्याचे टाळलेले असते...

त्याची न येण्याची गणिते वेगळी असतात

पण तिच्या प्रश्नांना उत्तरेच नसतात

मग त्याही अवस्थेत तिचा 'इंतजार'

शब्द बद्ध होतो ....

हृदयात हुरहूर, मनात काहूर
डोळ्याच्या पापण्यांनी थोपवला पूर
ओठ उलगले शब्द न फुटले
तुझ्या आठवांनी श्वासच थिजले

No comments:

Post a Comment