Sunday, October 3, 2010

आठवणींची वावटळ .....

 
 तो महिना  श्रावण नक्की होता.काहीतरी कारण काढून,
दोन दिवसांची रजा आणि दोन मित्र गाठून भटकायला  बाहेर पडलो होतो.
खरेतर चेंज  म्हणून पुणे  सोडून भटकंती आरंभली होती.
वरंध घाट ओलांडून माझी  राजदूत पार्क  करून,
रस्त्याला लागून  असलेल्या त्या छोट्या  पाण्याच्या प्रवाहाकडे पाहत बसलो होतो.
मित्र खाण्याच्या सोयीत गुंतले होते.
इतक्यात पाण्यावर घागर भरून  ती वर रस्त्याकडे आली.
परकर पोलके टिपिकल बंजारी प्रकारातले. वर येता येता माझी नजर तिच्याकडे
गेली घागरीतील पाणी हिंदकळून बटा भिजवीत छातीवर आले होते.
स्वतःच्या सौंदर्याची जाण नसणारी निरागसता
चेहऱ्यावर. आणि मनही तितकेच  निरागस. कारण,
 नजर भेट होताच असे काही गोड हसली कि..... जणू कोण बरे ?
तिच्या हास्य लहरींनी जुन्या आठवणीची मंद लकेर उठली.
पण स्मृतींना ओळख पटताच ओठांवर शब्द आले..
चोहीकडे हिरवळ
मध्ये पाण्याचा ओहळ
मन नभी का दाटली
आठवणींची वावटळ .......

No comments:

Post a Comment